हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon Update: देशात मान्सून परतीचा प्रवास रखडला; 8 दिवसांपासून जैसे थे स्थिती

Monsoon Updates: गेल्या आठ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या स्थितीत हवामान खात्याने कोणताही बदल नोंदवला नाही. आठ दिवसांपासून देशाच नैऋत्य मोसमी वाऱ्याची स्थिती जैसे थे आहे.

हवामान अंदाज. 23 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण भारतात मान्सूनच्या पावसाने थैमान (Heavy rainfall in india) घातलं आहे. निम्म्याहून अधिक देशातून मान्सून परतला असला तरी बऱ्याच राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला (Monsoon in india) आहे.

आणखी काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत. खरंतर, गेल्या आठ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या स्थितीत हवामान खात्याने कोणताही बदल नोंदवला नाही. आठ दिवसांपासून देशाच नैऋत्य मोसमी वाऱ्याची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पुढील आणखी काही दिवस देशात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत.

हे पण वाचा -   Monsoon Update: पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज । राज्यात 28 जुलै पासून 3 ऑगस्ट पर्यंत सुर्यदर्शन!

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून वापसी (Monsoon withdrawn) होणार आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांच इतके दिवस मान्सून थांबला आहे.

वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही, काही राज्यात अद्याप नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

पण दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. याचा दुहेरी प्रभाव मान्सूनवर पडला आहे. त्यामुळे देशात मान्सून रखडला आहे. सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग काही भाग आणि दक्षिण-ईशान्य भारतात मान्सून अडकला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनच्या वाऱ्याची हीच स्थिती कायम आहे. त्यामुळे देशात आणखी काही मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे.PROMOTED CONTENTBy 

हे पण वाचा -   Rain in Maharashtra: आगामी दोन दिवस अवकाळी पावसाचे…! राज्यात कुठे-कुठे बरसणार पाऊस; याचा शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम

हेही वाचा-

दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. तसेच आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Weather Update : "इथे" उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम! असे असेल आजचे हवामान

दरम्यान, काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. पण याची शक्यता खूपच कमी आहे. तर पुण्यात तीन दिवसानंतर हवामान खात्याने ढगाळ हवामानाची नोंद केली आहे. येथे कमाल 32.2 आणि किमान 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक23 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj