Maharashtra Monsoon - राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाकडून ऑरेंजसह यलो अलर्ट जारी - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Monsoon – राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाकडून ऑरेंजसह यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागानं ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. राज्यात २० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात आज सर्वत्र जोरदार पाऊस झाला.

Havaman Andaj Today Maharashtra

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून पुढील पाच दिवसांसाठी पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पाऊस होत आहे.

Maharashtra Monsoon Update Today

आज ज्या प्रमाणात पाऊस झाला त्यापेक्षा कमी पावसाची नोंद उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी केले आहेत.

हे पण वाचा -   Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !

हवामान विभागाकडून अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात प्रामुख्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केले आहेत.

महाराष्ट्रातील नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह बहुतांश जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे. मात्र, खरीप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मीटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासोबताच, सापगाव पूल बुडणार नाही अश्या पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, अजून पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल. तरी सापगाव पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती येण्याची शक्यता पाहून, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा -   कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे

पंढरपूरच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता

आज संध्याकाळी पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी सह सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं प्रशासन अलर्ट झालं आहे. बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यास उद्या सकाळी सुरुवात होणार आहे.

पंढरपूर शहराच्या सखल भागात धरणांमधून १ लाख १० हजार क्यूसेक विसर्ग झाल्यावर पाणी शिरण्यास सुरुवात होते. उजनी धरणातून ९० हजार क्यूसेक आणि वीर धरणातून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

इतर सर्व हवामान अंदाज

हे पण वाचा -   Panjab Dakh Havaman Andaj | २४ जून ते २ जुलै या तारखेपासून राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळणार; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक18 सप्टेंबर 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

Web Title: Maharashtra rain news pune satara sangli kolhapur marathwada vidarbha paschim maharashtra imd alert heavy rai ssa

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj