हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Forecast : डिसेंबरची सुरुवात अवकाळीनं आणि शेवटही, 28, 29 डिसेंबरला पावसाची हजेरी, यलो अलर्ट जारी

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं राज्यात येत्या 27 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

के. एस. होसाळीकर यांचं ट्विट

राज्यात कुठं पाऊस पडणार

हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची
शक्यता आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2022: मॉन्सून मराठवाड्यात , इतक्या दिवसात विदर्भात येणार मान्सून

29 डिसेंबरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.

नांदेडमध्ये थंडीचा जोर वाढला

गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवली .वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे. गव्हाच्या ओंब्या धरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला आणि फुले व घाटे धरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला थंडी फायदेशीर ठरत आहे.

निफाडमध्ये तापमान घटलं

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.5 अंश सेल्शिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या सात-आठ दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने ख्रिसमसच्या दिवशी आज निफाड तालुका थंडीने गारठून निघाला आहे. या थंडी पासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू उब मिळवायचा प्रयत्न नागरिक करीत आहे. या वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागेतील फुगवणी आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याच्या भीती मुळे द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपले द्राक्षबाग वाचवण्यासाठी ठिकाणी द्राक्षबागेत शेकोट्या पेटवल्या जात आहे.

हे पण वाचा -   Monsoon Update: आजपासून पाऊस "इतके दिवस" विश्रांती घेणार, पण ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस मुसळधार कोसळणार

इतर बातम्या:

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj