हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

सप्टेंबरमध्ये कशी असेल मान्सून स्थिती? हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Monsoon in Maharashtra: ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यात मिळून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूननं निराशा केली आहे. यानंतर सप्टेंबरमधील मान्सून स्थितीबाबत हवामान खात्यानं मोठी अपडेट दिली आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट: राज्यात मान्सूनचं  (Monsoon in Maharashtra) आगमन झाल्यानंतर यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.

सुरुवातील दिमाखात आगमन केल्यानंतर राज्यात मान्सूननं निराशा केली आहे. अनेक जिल्ह्यांत अद्याप अपेक्षित पाऊस कोसळला नाही. मागील जवळपास दीड महिन्यांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगलीसह कोकणात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण केली. त्यामुळे याचा कोकणाला अधिक फटका बसला आहे. दुसरीकडे विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षित पाऊस कोसळला नाही.

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज: ⛈️ 4 ऑक्टोबरला या 19 जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार – Panjab Dakh Havaman Andaj

दरम्यान गेल्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यात मिळून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

पण ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूननं निराशा केली आहे. पण सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-

हे पण वाचा -   Monsoon Update : ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस? वाचा.. । Weather

पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

दुसरीकडे, आज नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित बारा जिल्ह्यांत आज अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. आजही याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा -   मान्सून केरळात दाखल.! राज्यातील “या जिल्ह्यात” जोरदार पाऊस! 1/2/3 जून आजचा हवामान अंदाज

तर पुणे आणि मुंबईत अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj