येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
9 Aug,Heavy to very heavy rainfall in Mumbai, Thane, Navi Mumbai in past 24 hrs, till today morning.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 9, 2022
It rained very intensely in last 12 hrs too. pic.twitter.com/GzcfMPM1eO
हेही वाचा – Government scheme : ग्रामसमृद्धी योजना गाय गोठा या योजनेसाठी मिळणारे तब्बल 1 लाख रुपये
पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे आणि पालघरच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा
Moderate to intense spells of rain with gusty winds reaching 40-50 kmph very likely to occur at isolated places in the districts of Thane, Mumbai, Palghar, Raigad, Ratnagiri & Sindhudurg during next 3-4 hours: IMD Mumbai
— ANI (@ANI) August 8, 2022
दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?