येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा – Government scheme : ग्रामसमृद्धी योजना गाय गोठा या योजनेसाठी मिळणारे तब्बल 1 लाख रुपये
पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, ठाणे आणि पालघरच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
- Weather Alert | विदर्भात आजपासून पुढील २ दिवस वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
- Weather Update: विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- El Nino: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! एल निनोचा प्रभाव कमी होणार; यंदा देशात सरासरी 94 टक्के पावसाची शक्यता
- पंजाबराव म्हणतात…२,३,४,५ मार्च ला इथे होणार अवकाळी पाऊस ⛈️ | Panjabrao dakh LIVE 🛑 Havaman Andaj Today
- Weather Update | आज पाऊस पडणार आहे का ? पहा येत्या 48 तासात हवामान अंदाज